*दुःखच डोंगर पचवून तर बग?* *जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून तर बघ.* *चिमूट भर दुःखाने कोसळू नकोस कारण* *दुःखाचा डोंगर पचवून तर बग?* *मी सर्वांना जपतोय, बहुतेक इथेच मी चुकतोय कारण मी सर्वांना बदलताना बगतोय.वाटलंच तर मी त्यांच्या मनात राहण्याचा प्रयत्न करेन कारण घमंडा मध्ये तर इथे बहुतेक जण राहतात...!* *देवाने पोट दिलं आणि पोटाने भूक दिली आणि त्याच भुकेने दुःखावर मात करायला शिकवलं, कारण भूक लागली म्हणून पैसे खाता येत नाही आणि पैसे आहेत म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही? म्हणजेच जीवनात पैसे , ताकत आणि सौदर्य याला ठराविक रेषापर्येंतच स्थान आहे.* *हे मात्र खरं की, देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली कि देवा कडे कोटी पैसे मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतो मंदिरात, प्रत्यकाला मला समजून घेणे जमत नाही, कारण मी एक असा पुस्तक आहे की ज्यात शब्द कमी आणि सहनशीलता जास्त आहे.* *पटणार नाही कोणाला पण हे कटू सत्य आहे आपली परिस्तिथी पाहूनच आपल्यला किंमत आहे. पण हे तितकाच म्हवातचं की सोन्याची किंमत करायला सोनारच लागतो त्याची भंगारवाल्याकडून कधीच अपेक्षा करता येत नाही....!* *दिवस असेच बदलत नाही कोणाचे, मेहनत आणि अपमान एकाच वेळी सहन करावे लागेल कारण दुःखाचा डोंगर तर पचवून घ्यावाच लागेल...!* *आपला प्रिय* *कुणाल गौतमी-सुनील गायकवाड*